९५ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर जि लातूर या ऐतिहासिक शहरात २२,२३,२४एप्रिलमध्ये संपन्न होत आहे.ही लातूर जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी एक मोठीच पर्वणी आहे!तेव्हा जिल्ह्यातील सर्वांनी अगदी झाडून उपस्थिती लावायची.कार्यक्रम भरगच्च आहेत. भारताचे महामहिम राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविंद साहेब हे उपस्थित राहून संमेलनाला चार चांद लावणार आहेत.शिवाय बडे बडे राजकारणी ,अभिनेते, हास्य कलाकारांना आमंत्रित केले आहे.हे दिमाखदार साहित्य संमेलन आपण याची देही याची डोळा अनुभवले पाहिजे. यासाठीच हेआग्रहाचे निमंत्रण आहे बरे...सर्वांनी या साहित्य यात्रेला नक्की यायचं हं... आपला डॉ बालाजी रुक्मिणबाई राजाराम समुखराव हाडोळी ता चाकूर जि लातूर.
खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४ मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४ मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्