Skip to main content

Posts

Showing posts from 2019

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

*🕸🕸 सापळा* 🕸🕸 *लेखक अण्णाभाऊ साठे* *'लेका म्हारांनी पायरी सोडली,त्येस्नी आता गावचा* *इंगा दाखवू या,नायतर महार* *जात डोक्यावर बसल.* अस सांगत दादा देशमुख आळीपाळीने फिरला'.         त्यानं महारांविरुध्द आग पेटवली आणि एकदम भडका उडाला.उभा गाव पिसाळला. महारांवर इंगा फिरवण्याची भाषा जो तो बोलू लागला.महार वाड्यावरुन गाढवाचा नांगर फिरवून तरच नावाचा दादा देशमुख! अशी दादाने डिरकी टाकली.एकून एक लहान थोर चावडीवर जमले.महाराना घेवून येण्यासाठी बज्या रामोशी दांडालला गेला. आणि *महार चावडीवर आले की त्यांना झोडपूनच काढायचे असा विचार करित गाव चावडीवर बसला.*                कारण दादादेशमुखाचा वाड्यात मरनकळाच पसरली होती.आज दोन दिवस झाले देशमुखाचा प्रचंड बैल मरून दावनित पडला होता. तो लोखंडा प्रमाने ताठला होता.आणि भोपळ्या प्रमाणे फुगून डोळे वटारून पडला होता. भुंग्यासारख्या मोठाल्या माशांनी त्या बैलावर झाकण घातलं होतं. तो मेलेला बैल पाहून देशमुखाची बायका पोरं हवालदिल झाली होती.भयभीत झाली होती. दादा रडकुंडीला आला होता.*आपला बैल मेला या दुःखा ऐवजी त्याचा मृतदेह दोन दिवसांपासून वाड्यातुन हालत ना

प्राणी माहिती

               *(१) मगर* 🐊        मगर हा पाण्यात व जमिनीवर राहणारा उभयचर प्राणी आहे. तो सरपटणारा मांसभक्षक प्राणी आहे. त्याचा जबडा खूप शक्तिशाली असतो. तो उन्हात तोंड उघडे करून आराम करतो, तेव्हा  पक्षी त्याच्या दातात अडकलेले मांस खातात. कधीकधी पक्षी त्याचे भक्ष बनतात. मगर स्वतःची जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही. -----------------------------------------------------               *(२) कासव* 🐢        कासव हा उभयचर प्राणी आहे. त्याच्या पाठीवर जाड व टणक कवच असते. धोक्याची चाहूल लागताच कासव स्वतःला कवचाच्या आतमध्ये लपवितो. तो जमिनीवर अतिशय हळूहळू चालतो, परंतु पाण्यात तो चपळ आहे. कासव हा शाकाहारी असून तो वनस्पती खातो. तो शीतरक्ताचा प्राणी आहे. कासव हा दीर्घायुष्यी आहे. त्याचा जीवनकाल १०० वर्षापेक्षा जास्त आहे. -----------------------------------------------------                *(३) मासा* 🐟        मासा हा जलचर प्राणी असून त्याच्या  वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. माश्याला पापण्या नसल्याने तो डोळे उघडे ठेवून झोपतो. त्याला नाक नसते.तो कल्ल्याच्या साहाय्याने पाण्यात

सावित्रीबाई फुले

।। युग स्त्री-सावित्रीबाई ज्योतिबा फुले ।। परदेशातून भारतात आलेल्या आर्यांनी परमेश्वराच्या नावाने चार वर्णाची निर्मिती करुन मूळ रहिवाशी भारतीयांना शुद्र वर्णात टाकले. ह्या शुद्रांना (आजचा बहुजन समाज ) ६००० जातीमध्ये विभागून त्यांच्यात उच्चनीचतेची विषारी भावना रुजविली. बहुजन समाजाला दैववादी व अंधश्रध्दाळू बनवीले व आपल्या भजनी लावले. काल्पनिक देवधर्माच्या, स्वर्ग-नरकाच्या व पाप-पुण्याच्या मोहजालात गुरफटवून मानसिक व शारिरीक गुलामगिरीत बहुजानांना बंदिस्त करुन ठेवले. हा प्रकार गेली पांच हजार वर्षापासून या देशात चालत आलेला आहे. अशा मनुवादी जाचक व अनिष्ठ रुढी परंपरेवर म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले ह्यांनी प्रखर हल्ला चढविला. सावित्रीबाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगांव या गावी झाला. सन १८४० मध्ये त्यांचा विवाह ज्योतीराव फुलेशी झाला. ढोल गवॉंर शुद्र पशु नारी, सब ताडन के अधिकारी ! तुलशीदास (रामचरित मानस ) ह्या प्रमाणे मनुवादी व्यवस्थेत ’नारी’ ही सुध्दा शुद्रच होती. म्हणून शुद्राप्रमाणे स्त्रियांना सुध्दा शिक्षणापासून वंचीत ठेवले होते. शिक्ष

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस