क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे. तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...
रेणुकादास देवणीकर आज तहसीलदार पदी विराजमान झाले आहेत;परंतु त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा नक्कीच काट्याकुट्यानी भरलेला आहे.देवणी सारख्या एका छोट्या गावातून एका शिक्षकाचा मुलगा तालुका दंडाधिकारी होतो ,ही नक्कीच भूषणावह बाब आहे,विशेष म्हणजे तेही एका दलित समूहातून असल्यामुळे या यशाला नक्कीच सोनेरी किनार आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.वडिलांचे छत्र हरवल्यानंतर रेणुकादास यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेतला;पण या संस्कृतीत त्यांचा पिंड रमला नाही,त्यांनी घरच्यांना न सांगता उदगीर या तालुक्याच्या ठिकाणी कला शाखेत प्रवेश घेतला.वडिलांची प्रेरणा कायम सोबत होती.'मच्छिन्द्र सारखे टॉपला जा' हा वडिलांचा संदेश त्यांनी काळजात कोरला होता.मच्छिंद्र देवणीकर हे त्यांच्या भावकीतील व्यक्ती तेव्हा MPSC मार्फत निवड होऊन उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत होते.वडील गेल्यामुळे कसलेही मार्गदर्शन नव्हते,त्यामुळे आपण शोधावी तीच वाट,ती कधी खाच खळग्यांनी भरलेली ,तर काट्याने पाय आणि मनही कितीदा तरी रक्तबंबाळ झाले.पण चालणे थांबले नाही.बी ए झाले,एम ए झाले,पण हा बावन्नकशी हिरा झाकून र...