क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे. तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...
रेणुकादास देवणीकर आज तहसीलदार पदी विराजमान झाले आहेत;परंतु त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा नक्कीच काट्याकुट्यानी भरलेला आहे.देवणी सारख्या एका छोट्या गावातून एका शिक्षकाचा मुलगा तालुका दंडाधिकारी होतो ,ही नक्कीच भूषणावह बाब आहे,विशेष म्हणजे तेही एका दलित समूहातून असल्यामुळे या यशाला नक्कीच सोनेरी किनार आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.वडिलांचे छत्र हरवल्यानंतर रेणुकादास यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेतला;पण या संस्कृतीत त्यांचा पिंड रमला नाही,त्यांनी घरच्यांना न सांगता उदगीर या तालुक्याच्या ठिकाणी कला शाखेत प्रवेश घेतला.वडिलांची प्रेरणा कायम सोबत होती.'मच्छिन्द्र सारखे टॉपला जा' हा वडिलांचा संदेश त्यांनी काळजात कोरला होता.मच्छिंद्र देवणीकर हे त्यांच्या भावकीतील व्यक्ती तेव्हा MPSC मार्फत निवड होऊन उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत होते.वडील गेल्यामुळे कसलेही मार्गदर्शन नव्हते,त्यामुळे आपण शोधावी तीच वाट,ती कधी खाच खळग्यांनी भरलेली ,तर काट्याने पाय आणि मनही कितीदा तरी रक्तबंबाळ झाले.पण चालणे थांबले नाही.बी ए झाले,एम ए झाले,पण हा बावन्नकशी हिरा झाकून राहिला तरच नवल! एम ए मध्ये 58 टक्के मार्क्स घेऊन आपले नाणे खणखणीत आहे हे दाखवून दिले.मग सुरू झाली भाकरीच्या शोधात भटकंती...नारायण सुर्वेंच्या भाकरीचा चंद्र सापडत नव्हता.महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात CHB साठी मुलाखत दिली पण टॉप असूनही निवड झाली नाही,तेव्हा या व्यवस्थेचा राग आला.मग सैनिकी शाळेत जागा निघाल्या,तिथेही अर्ज केला व प्रथम क्रमांकावर निवड झाली.पोटाचा प्रश्न मिटला होता,पण स्वाभिमानाची लढाई बाकी होती.मग वडिलांनी दाखवलेले स्वप्न झोपू देत नव्हते.सुरू झाला मग MPSC स्पर्धा परीक्षेचा संघर्ष! पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षा व मुलाखत दिली पण 1 गुणांहून मेरिट हुकले,तेव्हा अश्रूंचा बांध फुटला! पण ते डगमगले नाहीत त्याच जोमाने दुसरी परीक्षा:पूर्व,मुख्य,मुलाखत आणि नायब तहसिलदार पदी निवड!!! पण येथेही नशिबाने थोडा दगा दिलाच,6 गुणांमुळे वर्ग 1 चे पद हुकले! पण आता टॉपचा जीना चढायचा होता,नायब तहसिलदार ही त्याची पहिली पायरी होती.आज 10 वर्षांनंतर क्लास 1 पदी प्रमोशन होऊन वडिलांचे शब्द रेणुकादास यांनी खरे करून दाखवले आहेत.या प्रवासही काही साधा नव्हताच मुळी!अनेक कटू अनुभव पचवीत हा प्रवास पूर्ण केला.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे ज्या समाजात तुमचा जन्म झाला त्यांचा उध्दार करणे हे तुमचे कर्तव्य आहे.या कर्तव्याची जाणीव ठेवून कोणतेही काम ते पुढाकार घेऊन करतात.गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची अखंड धडपड सुरू असते.त्यांच्या या प्रवासाला मानाचा मुजरा!पुढील कार्यास प्रचंड शुभेच्छा!!!💐💐💐
https://twitter.com/drbalajisamukh1/status/1407941309801713668?s=08
Comments
Post a Comment