Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ 





 मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.

    तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्वक क्षमायाचना करतो.दुसरे म्हणजे या कोविड च्या जागतिक महामारीत आणखी पुन्हा उशीर !पण काही हरकत नाही ,उशीर झाला तरी क्वालीटी कोम्प्रोमाईज अजिबात केले नाही.तर ज्या 45 मान्यवरांनी आपले अतिशय उच्च कोटीचे निबंध पाठवून दिले व आपणासाठी एक दुर्मिळ ठेवा उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार!

    आता पाहू या या अनमोल ग्रंथाविषयी :

    आपणास क्रांतीगुरू लहूजी साळवे यांच्याबद्दल काय माहिती आहे?

    त्यांना क्रांतीगुरू का म्हणतात?

    त्यांचा आणि महात्मा फुले यांचा काही संबंध आहे का?

    महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या चळवळीशी काही संबंध आहे का?

    त्यांचे स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान आहे का?

    भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यात त्यांचे योगदान काय व किती?

    त्यांनी खरेच लोकमान्य टिळकांना कुस्तीचे धडे दिले का/

    त्यांचे तालमीत तयार झालेले शिष्यगण कोण?

    ते आजन्म अविवाहित का राहिले?

    काय आहे त्यांची आजन्म ब्रम्हचारी राहण्याची शपथ?

    शिष्य आभाळाएवढे झाले पण का राहिला त्यांचा  गुरु दुर्लक्षित?

    त्यांचे घराणे छत्रपतींच्या दरबारात खरेच कोणत्या उंचीचे होते?

    पुणे परिसरातील चळवळी देशपातळीवर गाजल्या पण हा योद्धा का राहिला दुर्लक्षित?

    अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा संदर्भ ग्रंथ आपण नक्कीच वाचला पाहिजे.


या ग्रंथाची मुळ किंमत =350 रु

सवलतीत किंमत = 250 +50 (पोस्टेज खर्च )=300 रु.

आजच आपली कॉपी सुरक्षित करा.पुढील लिंक वर नोंदणी करा 

येथे क्लिक करा.

  👆👆👆


                        संपादक 

डॉ सुशीलप्रकाश चिमोरे            डॉ बालाजी समुखराव

 M A. B ED. PH D.                     MA. M ED. NET(शिक्षणशास्त्र) MA ENGLISH, SET NET MARATHI 

 मराठी विभाग प्रमुख                      PH D MARATHI                                             

९३५६७७१५५२;                            ९२८४३७६४९४

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस