*🕸🕸 सापळा* 🕸🕸 *लेखक अण्णाभाऊ साठे* *'लेका म्हारांनी पायरी सोडली,त्येस्नी आता गावचा* *इंगा दाखवू या,नायतर महार* *जात डोक्यावर बसल.* अस सांगत दादा देशमुख आळीपाळीने फिरला'. त्यानं महारांविरुध्द आग पेटवली आणि एकदम भडका उडाला.उभा गाव पिसाळला. महारांवर इंगा फिरवण्याची भाषा जो तो बोलू लागला.महार वाड्यावरुन गाढवाचा नांगर फिरवून तरच नावाचा दादा देशमुख! अशी दादाने डिरकी टाकली.एकून एक लहान थोर चावडीवर जमले.महाराना घेवून येण्यासाठी बज्या रामोशी दांडालला गेला. आणि *महार चावडीवर आले की त्यांना झोडपूनच काढायचे असा विचार करित गाव चावडीवर बसला.* कारण दादादेशमुखाचा वाड्यात मरनकळाच पसरली होती.आज दोन दिवस झाले देशमुखाचा प्रचंड बैल मरून दावनित पडला होता. तो लोखंडा प्रमाने ताठला होता.आणि भोपळ्या प्रमाणे फुगून डोळे वटारून पडला होता. भुंग्यासारख्या मोठाल्या माशांनी त्या बैलावर झाकण घातलं होतं. तो मेलेला बैल पाहून देशमुखाची बायका पोरं हवालदिल झाली होती.भयभीत झाली होती. दादा रडकुंडीला आला होता.*आपला बैल मेला या दुःखा ऐवजी त्याचा मृतदेह दोन दिवसांपासून वाड्यातुन हालत ना
खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४ मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४ मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्