* क्रांतिगुरु लहुजी साळवे* हा परिवर्तनवादी चळवळी साठी मोठाच संदर्भग्रंथ ठरावा असा ग्रंथराज आपणासाठी उपलब्ध झाला आहे.महाराष्ट्रातील 46 मान्यवर अभ्यासक , संशोधक,लेखक,चिंतक, चळवळीतील कार्यकर्ता यांच्या साक्षेपी लेखणीतून निर्मित झालेला हा अमूल्य असा ग्रंथराज आहे.आजपर्यंत *क्रांतिगुरु लहुजी साळवे* यांच्यावर उपलब्ध असलेल्या ग्रंथांपैकी सर्वोत्तम असा हा ग्रंथ आहे. *क्रांतिगुरु लहुजी साळवे* यांच्या ऐतिहासिक कार्याचे संशोधक दृष्टीतून तर्कशुद्ध विवेचन करण्यात आले असून त्यांच्या प्रत्येक पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यांच्यावर घेतले जाणारे आक्षेप साधार खोडून काढले आहेत.तेव्हा असा हा सर्वांगाने विचार करणारा आणि वाचकाला विचार करायला लावणारा महाग्रंथ आपल्या सेवेत रुजू करताना संपादक म्हणून आम्हांला नक्कीच आनंद होत आहे.*इतिहास लेखन* कसे असले पाहिजे याचा उत्तम नमुना म्हणून या महाग्रंथाकडे पाहता येईल. ग्रंथाचे मुखपृष्ठ औरंगाबाद येथील चळवळीतील कार्यकर्ता एक मनस्वी कलावंत *सरदार जाधव* यांनी रेखाटले असून इतिहासाबद्दल आवड आणि वर्तमानाचे भान ठेवायला लावणारे आहे.क्वा
खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४ मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४ मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्