।। युग स्त्री-सावित्रीबाई ज्योतिबा फुले ।। परदेशातून भारतात आलेल्या आर्यांनी परमेश्वराच्या नावाने चार वर्णाची निर्मिती करुन मूळ रहिवाशी भारतीयांना शुद्र वर्णात टाकले. ह्या शुद्रांना (आजचा बहुजन समाज ) ६००० जातीमध्ये विभागून त्यांच्यात उच्चनीचतेची विषारी भावना रुजविली. बहुजन समाजाला दैववादी व अंधश्रध्दाळू बनवीले व आपल्या भजनी लावले. काल्पनिक देवधर्माच्या, स्वर्ग-नरकाच्या व पाप-पुण्याच्या मोहजालात गुरफटवून मानसिक व शारिरीक गुलामगिरीत बहुजानांना बंदिस्त करुन ठेवले. हा प्रकार गेली पांच हजार वर्षापासून या देशात चालत आलेला आहे. अशा मनुवादी जाचक व अनिष्ठ रुढी परंपरेवर म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले ह्यांनी प्रखर हल्ला चढविला. सावित्रीबाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगांव या गावी झाला. सन १८४० मध्ये त्यांचा विवाह ज्योतीराव फुलेशी झाला. ढोल गवॉंर शुद्र पशु नारी, सब ताडन के अधिकारी ! तुलशीदास (रामचरित मानस ) ह्या प्रमाणे मनुवादी व्यवस्थेत ’नारी’ ही सुध्दा शुद्रच होती. म्हणून शुद्राप्रमाणे स्त्रियांना सुध्दा शिक्षणापासून वंचीत ठेवले होते. शिक्ष
खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४ मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४ मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्