*10 ते 99 अंक कसे शिकवावे*
1लीच्या वर्गशिक्षका कडे फार मोठा *संयम* असला पाहिजे कारण
*पेरलं की लगेच उगवत नसतं*
त्याला खत पाणी (कृती,पद्धत, साहित्य व उपक्रम) लागतेच.
आपल्या वर्गातील विद्यार्थी 3 प्रकारची असतात..
*1)ऐकुन शिकणारी*
*2)पाहून शिकणारी*
*3)कृतीतून शिकणारे*
हे सुरुवातीला समजून घ्या.
*आता शिकवावे कसे*
◆सुरुवातीला कृतीतूनच सर्वांना शिकवायचं
◆ मुलांचे 1ते9 अंक ओळख झाली आहे का ते तपासून घ्या
◆आत आपल्याला दशक संकल्पना शिकवायचं आहे.
◆विद्यार्थ्यांना दशक कसा तयार होतो हे काड्या, खडे, मणी गोट्या, विविध बी, गजगे, झाकण इ,,, साहित्याच्या साह्याने तुम्ही स्वतः करून दाखवा व दशक करत असताना असे म्हणत रहा "दशक म्हणजे दहा" दशक म्हणजे दहा...
◆म्हणजे मुले समजून जातील की दशक म्हणजे दहा
◆आता त्यांना वरील साहित्य हाताळायला द्या व दशक बनवायला लावा मुले नक्की दशक बनवून दाखवतीलच (हा माझा अनुभव) दशक संकल्पना विद्यार्थ्यांची आता पक्की झाली कारण त्यांना कळले दशक म्हणजे दहा बनवताही येत व ओळखता ही येते.
( *मात्र शाळेत वरील साहित्य* *असलेच पाहिजे कारण आपण कृतीतून शिकवतोय*)
◆आता खरी पद्धत सुरू◆
◆3 दिवस एक ओळ शिकवायची
उदा:- 11ते20ओळ, 21ते30ओळ, 31ते40ओळ
......91ते99ओळ
*म्हणजे 3दिवस × 9ओळी =27 दिवस* लागतील
(आपले 50 का लागेना)
मग 3 दिवस कोणते
◆पहिला दिवस कृतीतून साहित्य हाताळून शिकवावे
◆दुसरा दिवस साहित्य पाहून शिकवावे
◆तिसरा दिवस ऐकून शिकवावे
◆पहिला दिवस पाहू◆
*कृतीतून शिकवावे*
◆आता आपण पहिली ओळ म्हणजे 11ते20 कशी शिकवायची पाहू
◆सुरुवातीला दशकाचे 10 गठ्ठे बनवून घ्या एका खाली एक असे 10 बनवा.
◆आता एक सुट्टी वस्तू घ्या दशकाच्या गटात टाका व म्हणा एक दशक एक अकरा
◆आता 2 वस्तू घ्या दुसऱ्या दशकाच्या गटात टाका व म्हणा एक दशक दोन बारा..
◆आता 3वस्तू घ्या तिसऱ्या दशकाच्या गटात टाका व म्हणा एक दशक 3 तेरा
◆आशा प्रकारे सुट्या दहा वस्तू दहा दशकाच्या गटात ओळीने टाका व म्हणत रहा...
◆शेवटी दहाव्या दशकाच्या गटात दहा वस्तू टाकताना सांगा
या दहा वस्तू व या दहा वस्तू म्हणजेच एक दशक व एक दशक मिळून 2 दशक होतात आणि त्याला म्हणायचं 2 दशक वीस...
◆आशा प्रकारे पहिल्या दिवसात प्रत्येक मुलाला हीच कृती करायला लावावी..
◆यामुळे प्रत्येक संख्या कशी तयार झाली हे मुलांना कळेल व संख्याच *संख्यापण* ही कळेल
◆आशा प्रकारे पहिला दिवस शिकवावा
◆आता दुसरा दिवस◆
*पाहून शिकवावे*
◆ सुरुवातीला थोडा वेळ पहिल्या दिवसाच्या कृती घ्या
◆आता फक्त आपणच दशक गट बनवायचे व वस्तू टाकायच्या आणि त्या मुलांनी ओळखायचा व सांगायच्या.
◆ही कृती करताना विद्यार्थ्यांना सर्व वस्तू नीट दिसाव्यात, टाकलेले समजावे यासाठी आपली गती सावकाश हवी
◆ आशा प्रकारे प्रत्येक 11ते20 अंकाचा प्रत्येक मुलाचा पाहून ओळखण्याचा सराव घ्यावा
◆दिवस तिसरा◆
*ऐकून शिकवणे*
◆सुरुवातीला मागील 2दिवसांचा थोडक्यात सराव घ्या
◆यात आपण स्पष्ट उच्चार करून संख्या उच्चारावी जसे की
एक दशक एक अकरा
एक दशक दोन बारा
एक दशक आठ अठरा...
यापद्धतीने 11ते 20 अंकाचे उच्चार करावे मुले अचूक संख्या ओळखतील व लेखन करतील
*11 ते 20 या ओळीसाठी आपण 3दिवस दिले आहेत यात आपण विविध उपक्रम वापरून प्रत्येक दिवस भारी करू शकतो*
◆अशा पध्दतीने *सर्व* अंक शिकवावे
◆ *यात पद्धतीत शिक्षकाने घाई करू नये 1 ओळ शिकवण्यासाठी 3 दिवस ऐवजी 4/5 दिवस लागुदया पण विद्यार्थ्यांना संख्या कशी तयार झाली हे कळूद्या*
◆संख्या दृढीकरणासाठी
11 22 33 44 55..
12 32 43 52..
26 36 46 56...
28 38 48 58...
असे संख्याचे गट करून वाचन घेऊ शकतो.
परंतु
◆19 29 39 49 ...99 आशा संख्या शिकवताना आपल्याला खूप सराव घ्या लागतो या साठी
*पद्धत 1--*
एका खाली एक
फळ्यावर अशा पद्धतीने लिहून ठेवा फक्त एवढ्याच 👇
19 29 39 49 59 69 79 89
20 30 40 50 60 70 80 90
या पद्धतीने वाचन सराव घ्या
एकोणतीस तीस
एकोणचाळीस चाळीस
एकोणसत्तर सत्तर
*भरपूर सराव घ्या* पाहून नंतर नंतर मुलांच्या लक्षात राहते.
*पद्धत 2री --*
1 उना वीस म्हणजे एकोणविस
1 उना तीस म्हणजे एकोनतीस
1उना ऐंशी म्हणजे एकोनऐंशी
*पद्धत 3री--*
मुलांना सांगा
दोन दशक च्या गठ्ठयात आपण 9 टाकले आहेत मग दोन दशक नऊ एकोणतीस असे म्हणून घेऊ शकतो.
◆आशा पध्दतीने आपण घेऊ शकतो बऱ्याच शिक्षकांची वेगळी पद्धत असू शकते..
◆एक पध्दतीने शिकवून विद्यार्थ्यांना नाही समजलं तर शिक्षकाकडे वेगवेगळ्या पद्धती असायला पाहिजे.
◆ नुसते *पुस्तकाच्या पद्धती* शिकवलेलं सर्वच विद्यार्थ्यांना समजेल असे नाही. कारण *पुस्तक हे साधन आहे साध्य नाही*
कसं ही शिकवा पण शेवटचा विद्यार्थी शिकला पाहिजे...
◆प्रत्येक विद्यार्थ्याचा समजून घेण्याचा स्तर हा वेगवेगळा असतो विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने समजेल तीच पद्धत वापरली पाहिजे...
*सर्वच विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने नाही समजणार*
◆कारण शेवटचा विद्यार्थी शिकला पाहिजे असं मत आपले असले पाहिजे
आणि या शेवटच्या विद्यार्थ्यामुळेच महाराष्ट्र *प्रगत* होणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे..
1लीच्या वर्गशिक्षका कडे फार मोठा *संयम* असला पाहिजे कारण
*पेरलं की लगेच उगवत नसतं*
त्याला खत पाणी (कृती,पद्धत, साहित्य व उपक्रम) लागतेच.
आपल्या वर्गातील विद्यार्थी 3 प्रकारची असतात..
*1)ऐकुन शिकणारी*
*2)पाहून शिकणारी*
*3)कृतीतून शिकणारे*
हे सुरुवातीला समजून घ्या.
*आता शिकवावे कसे*
◆सुरुवातीला कृतीतूनच सर्वांना शिकवायचं
◆ मुलांचे 1ते9 अंक ओळख झाली आहे का ते तपासून घ्या
◆आत आपल्याला दशक संकल्पना शिकवायचं आहे.
◆विद्यार्थ्यांना दशक कसा तयार होतो हे काड्या, खडे, मणी गोट्या, विविध बी, गजगे, झाकण इ,,, साहित्याच्या साह्याने तुम्ही स्वतः करून दाखवा व दशक करत असताना असे म्हणत रहा "दशक म्हणजे दहा" दशक म्हणजे दहा...
◆म्हणजे मुले समजून जातील की दशक म्हणजे दहा
◆आता त्यांना वरील साहित्य हाताळायला द्या व दशक बनवायला लावा मुले नक्की दशक बनवून दाखवतीलच (हा माझा अनुभव) दशक संकल्पना विद्यार्थ्यांची आता पक्की झाली कारण त्यांना कळले दशक म्हणजे दहा बनवताही येत व ओळखता ही येते.
( *मात्र शाळेत वरील साहित्य* *असलेच पाहिजे कारण आपण कृतीतून शिकवतोय*)
◆आता खरी पद्धत सुरू◆
◆3 दिवस एक ओळ शिकवायची
उदा:- 11ते20ओळ, 21ते30ओळ, 31ते40ओळ
......91ते99ओळ
*म्हणजे 3दिवस × 9ओळी =27 दिवस* लागतील
(आपले 50 का लागेना)
मग 3 दिवस कोणते
◆पहिला दिवस कृतीतून साहित्य हाताळून शिकवावे
◆दुसरा दिवस साहित्य पाहून शिकवावे
◆तिसरा दिवस ऐकून शिकवावे
◆पहिला दिवस पाहू◆
*कृतीतून शिकवावे*
◆आता आपण पहिली ओळ म्हणजे 11ते20 कशी शिकवायची पाहू
◆सुरुवातीला दशकाचे 10 गठ्ठे बनवून घ्या एका खाली एक असे 10 बनवा.
◆आता एक सुट्टी वस्तू घ्या दशकाच्या गटात टाका व म्हणा एक दशक एक अकरा
◆आता 2 वस्तू घ्या दुसऱ्या दशकाच्या गटात टाका व म्हणा एक दशक दोन बारा..
◆आता 3वस्तू घ्या तिसऱ्या दशकाच्या गटात टाका व म्हणा एक दशक 3 तेरा
◆आशा प्रकारे सुट्या दहा वस्तू दहा दशकाच्या गटात ओळीने टाका व म्हणत रहा...
◆शेवटी दहाव्या दशकाच्या गटात दहा वस्तू टाकताना सांगा
या दहा वस्तू व या दहा वस्तू म्हणजेच एक दशक व एक दशक मिळून 2 दशक होतात आणि त्याला म्हणायचं 2 दशक वीस...
◆आशा प्रकारे पहिल्या दिवसात प्रत्येक मुलाला हीच कृती करायला लावावी..
◆यामुळे प्रत्येक संख्या कशी तयार झाली हे मुलांना कळेल व संख्याच *संख्यापण* ही कळेल
◆आशा प्रकारे पहिला दिवस शिकवावा
◆आता दुसरा दिवस◆
*पाहून शिकवावे*
◆ सुरुवातीला थोडा वेळ पहिल्या दिवसाच्या कृती घ्या
◆आता फक्त आपणच दशक गट बनवायचे व वस्तू टाकायच्या आणि त्या मुलांनी ओळखायचा व सांगायच्या.
◆ही कृती करताना विद्यार्थ्यांना सर्व वस्तू नीट दिसाव्यात, टाकलेले समजावे यासाठी आपली गती सावकाश हवी
◆ आशा प्रकारे प्रत्येक 11ते20 अंकाचा प्रत्येक मुलाचा पाहून ओळखण्याचा सराव घ्यावा
◆दिवस तिसरा◆
*ऐकून शिकवणे*
◆सुरुवातीला मागील 2दिवसांचा थोडक्यात सराव घ्या
◆यात आपण स्पष्ट उच्चार करून संख्या उच्चारावी जसे की
एक दशक एक अकरा
एक दशक दोन बारा
एक दशक आठ अठरा...
यापद्धतीने 11ते 20 अंकाचे उच्चार करावे मुले अचूक संख्या ओळखतील व लेखन करतील
*11 ते 20 या ओळीसाठी आपण 3दिवस दिले आहेत यात आपण विविध उपक्रम वापरून प्रत्येक दिवस भारी करू शकतो*
◆अशा पध्दतीने *सर्व* अंक शिकवावे
◆ *यात पद्धतीत शिक्षकाने घाई करू नये 1 ओळ शिकवण्यासाठी 3 दिवस ऐवजी 4/5 दिवस लागुदया पण विद्यार्थ्यांना संख्या कशी तयार झाली हे कळूद्या*
◆संख्या दृढीकरणासाठी
11 22 33 44 55..
12 32 43 52..
26 36 46 56...
28 38 48 58...
असे संख्याचे गट करून वाचन घेऊ शकतो.
परंतु
◆19 29 39 49 ...99 आशा संख्या शिकवताना आपल्याला खूप सराव घ्या लागतो या साठी
*पद्धत 1--*
एका खाली एक
फळ्यावर अशा पद्धतीने लिहून ठेवा फक्त एवढ्याच 👇
19 29 39 49 59 69 79 89
20 30 40 50 60 70 80 90
या पद्धतीने वाचन सराव घ्या
एकोणतीस तीस
एकोणचाळीस चाळीस
एकोणसत्तर सत्तर
*भरपूर सराव घ्या* पाहून नंतर नंतर मुलांच्या लक्षात राहते.
*पद्धत 2री --*
1 उना वीस म्हणजे एकोणविस
1 उना तीस म्हणजे एकोनतीस
1उना ऐंशी म्हणजे एकोनऐंशी
*पद्धत 3री--*
मुलांना सांगा
दोन दशक च्या गठ्ठयात आपण 9 टाकले आहेत मग दोन दशक नऊ एकोणतीस असे म्हणून घेऊ शकतो.
◆आशा पध्दतीने आपण घेऊ शकतो बऱ्याच शिक्षकांची वेगळी पद्धत असू शकते..
◆एक पध्दतीने शिकवून विद्यार्थ्यांना नाही समजलं तर शिक्षकाकडे वेगवेगळ्या पद्धती असायला पाहिजे.
◆ नुसते *पुस्तकाच्या पद्धती* शिकवलेलं सर्वच विद्यार्थ्यांना समजेल असे नाही. कारण *पुस्तक हे साधन आहे साध्य नाही*
कसं ही शिकवा पण शेवटचा विद्यार्थी शिकला पाहिजे...
◆प्रत्येक विद्यार्थ्याचा समजून घेण्याचा स्तर हा वेगवेगळा असतो विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने समजेल तीच पद्धत वापरली पाहिजे...
*सर्वच विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने नाही समजणार*
◆कारण शेवटचा विद्यार्थी शिकला पाहिजे असं मत आपले असले पाहिजे
आणि या शेवटच्या विद्यार्थ्यामुळेच महाराष्ट्र *प्रगत* होणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे..
Comments
Post a Comment