९५ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर जि लातूर या ऐतिहासिक शहरात २२,२३,२४एप्रिलमध्ये संपन्न होत आहे.ही लातूर जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी एक मोठीच पर्वणी आहे!तेव्हा जिल्ह्यातील सर्वांनी अगदी झाडून उपस्थिती लावायची.कार्यक्रम भरगच्च आहेत.
भारताचे महामहिम राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविंद साहेब हे उपस्थित राहून संमेलनाला चार चांद लावणार आहेत.शिवाय बडे बडे राजकारणी ,अभिनेते, हास्य कलाकारांना आमंत्रित केले आहे.हे दिमाखदार साहित्य संमेलन आपण याची देही याची डोळा अनुभवले पाहिजे.
यासाठीच हेआग्रहाचे निमंत्रण आहे बरे...सर्वांनी या साहित्य यात्रेला नक्की यायचं हं...
आपला
डॉ बालाजी रुक्मिणबाई राजाराम समुखराव
हाडोळी ता चाकूर जि लातूर.
Comments
Post a Comment