Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

मधाचे फायदे

*🔸थंडीत १ चमचा मध सेवनाचे २० गुणकारी फायदे
➖➖
*मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे.  आणि याचे सेवन कायमचहितकारक असते*.

दररोज एक चमचा मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उर्जवान, स्वस्थ राहते, परंतु थंडीमध्ये याचे सेवन केल्यास खूप फायदे प्राप्त होतात. थंडीत वातावरणातील गारवा आणि शरिरात होणारे बदल यासाठी मध ही अतिशय चांगली असते.

*मधात हे मिश्रण असते*

मधामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज अशा सर्व महत्वाच्या आणि आवश्यक शर्कारांचे मिश्रण असते. या सर्वांमध्ये एकत्रितपणे ७५ टक्के साखर असते. मधाला गुणाकरी का म्हणतात याचा अंदाज यावरून येईल की मधामध्ये एन्जाइम, अमीनो एसिड, प्रोटीन, एल्ब्युमिन, कार्बोहायड्रेट्स, आयोडीन, लोह, सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, क्लोरीन इत्यादी गुणकारी तत्व असतात.
☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘

*🎯मध खाण्याचे फायदे 🎯*

१) मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

२) हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

३) हिवाळ्यामध्ये पटकण भूक लागत नाही त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

४) त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय पाचन शक्ती सुधारते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

५) खाज, खरूज यासारख्या त्वचेसंबंधीत आजारांचा ज्यांना त्रास होतो त्यांनी ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्यामुळे या त्वचा रोगांचा त्रास कमी होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

६ ) व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

७) कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

८) उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

९) रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

१०) हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

११) रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

१२) मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

१३) रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

१४) पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करण्यात फायदा होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

१५) चेहऱा कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बेसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

१६) रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

१७) मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

१८) टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

१९) मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

२०) मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.
🔸🔸🔸🔸🔸🔸

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस