Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

ययाती कादंबरीचा परिचय

📕        📖 📖 *पुस्तक परिचय* ➡  🌹 *ययाती* 🌹 *ययाती......*  वि.स.खांडेकर  ✍🏻 या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबध नसून ही कादंबरी पौराणिक घटना एकत्र करुन स्वातंत्र्य रित्या मांडली आहे. पुराणकथा म्हणजे खुप काहि भव्य आणि भयंकर लढा हे जास्त आढळुन येते पण ह्या कांदबरी ठराविक घटना घेऊन जीवन हे एक क्षणाभंगूर तसेच दुस-या बाजूने ते चिरंतर, भौतिक व आत्मिक आहे हे सांगितले. बहुतांवशी आपण पुराणकथेत त्यांचे संर्घष व लढा पाहतो त्या लढाईसाठी केलेले डावपेज पाहतो परंतु ह्या कथेत एका राजाच्या जीवनातील खाचखळगे दाखविले आहे. त्याची मांडणी सहज व साध्या पद्धतीने आपल्यासमोर मांडली आहे. त्यांची शृंगारिक भाषाशैली ही खुप सुरेख आहे. कथा तशी छोटीच आहे पण त्यातील भाषाशैली व त्या काळात दृश्य आपल्यासमोर खुप व्यवस्थित रित्या मांडले आहे. ययाती ह्या कांदबरीची सुरवातच खुप छान केली आहे. " राजे राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऎकतात त्यांच्या प्रेमकथात तर जगाला फार गोडी वाटते. मोठे कवी त्या कथांवर काव्ये रचतात" पण ही कहाणी एक प्रेम कथा छे ती ती कसली कथा आहे कोणाल...

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघ...

तांड्यावर तिरंगा फडकला

तांड्यावर तिरंगा फडकला ...!! “विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली,नीतीविना गती गेली,गतीविना वित्त गेले,वित्ताविना शुद्र खचले,इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.” हे महात्मा फुले यांचे सुवचन मानवी जीवनात विद्येचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करणारे आहे.विद्या नसेल तर माणूस गुलाम बनतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी, “गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल” असे म्हटले आहे.मानवी जीवनात विद्येचे महत्त्व या दोन्ही महापुरुषांनी स्पष्ट केले आहे.शिक्षण नसेल तर मानवी प्रगतीत गतिरोध निर्माण होतो.शिक्षणापासून कोसो मैल दूर असलेल्या कर्नाटक सीमेलगत वसलेल्या देवणी तालुक्यातील विळेगावजवळील राम-लक्ष्मण तांड्यावर शिक्षणाची पहाट कशी उजाडली त्याची ही कथा...        दि.२७ नोव्हेंबर १९९९ हा दिवस राम-लक्ष्मण तांडा विळेगाव येथील रहिवाशांच्या जीवनात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा असाच आहे.कारण याच दिवशी या तांड्यावर शिक्षणाची नवी पहाट उजाडली.डी.पी.ई.पी.अंतर्गत पहिल्यांदाच प्राथमिक शाळा सुरु झाली आणि वर्षानुवर्षे अंधारमय जीवन जगणाऱ्या तांडावासीयांच्या आयुष्यात शिक्षणाचा नवीन सूर्यो...

Popular posts from this blog

चंद्रयान 3 चंद्रावर पोहचले

डोळ्यांचे आरोग्य कसे राखावे?

*🍀🍀डोळे  व आरोग्य*🍀🍀 १. डोळे हे मनुष्याला मिळालेले मोठे वरदान आहे. देवाने दिलेल्या या सुंदर अवयवाची आवश्‍यक ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. आजकाल सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकप वेगळा केला जातो व त्यामुळे सौंदर्यात भरच पडते. हे सौंदर्य जसे बाहेरून वाढवले जाते तसेच आतून सुद्धा डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. *२. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये अन्नपदार्थातून मिळतात.* *३. केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या*:  जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुव...

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस